महानुभाव पंथातील प्रसिद्ध बा. भो. शास्त्री यांच्या आत्मचरित्राचा हा पहिला भाग आहे. महानुभाव पंथाच्या चाकोरीच्या आत आणि बाहेर त्यांनी मुक्त संचार केला. महानुभाव पंथ ते अक्षरशः जगले. साहजिकच पंथहिताच्या दृष्टीने जे योग्य आहे, ते सर्व या पुस्तकात आले आहे. मात्र, त्यांनी परिस्थितीशी संघर्ष केला. आयुष्यातील खाचखळगे पार केले, हा सर्व भाग त्यांच्या आत्मचरित्रात वाचायला मिळतो.
महानुभाव जेव्हा आयुष्यात आला, तेव्हा जीवनाला कसे वळण मिळाले, ते त्यातून दिसते. डोंगरगावातील बालपण, तेथील माणसे, भगवद् गीता, महानुभाव होणे अशा टप्प्यांमधून हा प्रवास सुरू होतो. भिक्षापात्र हाती घेतल्यानंतरचे कौटुंबिक आयुष्य, संन्यास, लेखन, सप्ताह, व्याख्याने, प्रवचन, दीक्षा महोत्सव, धर्मसभा आदींविषयीचा मजकूर वाचायला मिळतो.
प्रकाशक : आदित्य प्रकाशन
पाने : १५२
किंमत : २०० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)